Posts

Showing posts with the label Marathi Post

किटकनाषकांचे लेबल व त्यांच्या क्लेमबाबत शेतकर्याचे अधिकार व सर्व माहिती

Image
किटकनाषकांचे लेबल म्हणजे काय व त्यांच्या क्लेमबाबत सर्व माहिती                     शेतकरी मित्रांनो  आपण आपल्या शेतामध्ये किटकणाषके , बुरशीनाषके किंवा तननाषके यांचा वापर करतो. याचा कधी कधी पिकावर चांगला परिणाम होत नाही मग बर्‍याचदा आपण दुकानदार किंवा त्या कंपनीला दोष देतो यामध्ये आपले जे नुकसान व्हायचे ते तर होते. म्हणूनच माझ्या शेतकरी बांधवांनी त्यांचे अधिकार व आपण कोणत्या प्रकारचे म्हणजेच शासनाने प्रमाणित केलेले किटकणाषके वापरत आहोत किंवा कुठल्या बोगस कंपनीच्या औषधाचा तर वापर करत नाहीतणा याबद्दल जागरूक होणे हि काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो जाणून घ्या      शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम खरेदी करतांना शासनाने ज्या कृषि सेवा केंद्रास अधिकृत किटकणाषके बियाणे व खते विक्रीसाठी परवाना दिलेला आहे अश्याच केंद्रातून खरेदी करावी व पक्के बिल घ्यावे. शासनाने अशा दुकानास गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकर्‍यांच्या सुविधे साठी अधिकृत किटकणाषके  बियाणे व खते विक्रीसाठी ( निविष्टा ) परवाना दिलेला असतो. व शासकीय अधिकारी वेळोवेळी दुकानातील किटकणाषके बियाणे व खते यांची गुणवत्ता म्हणजेच सॅम्पल ची वेळोवेळी तपास

हरभरा लागवड | हरभरा उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या बाबी | हरभरा सुधारित वान | हरभरा पिकातील कीड व रोग | हरभरा लागवडी साठी जमीन | काबुली हरभर्‍याच्या सुधारित जाती

Image
हरभरा पिकाबद्दल थोडक्यात                            हरभरा हे रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकांपैकी एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तसेच मानवी आहारात हरभर्‍याचे खूप महत्व आहे. नवीन सुधारित वानांचा विचार केला असता प्रगतिशील शेतकर्‍यांच्या शेतामधील सुधारित वनांचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत गेल्याचा अनुभव आहे. या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागे कारण हरभर्‍यावरील घाटेअळी तसेच विविध कीड व रोग हे आहे. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणाची निवड तसेच कीड व रोगाचे चुकीचे नियोजन हे देखील उत्पादनावर परिणाम करते. हरभर्‍यावरील घाटेअळी ही ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान करते.  उत्पादन वाढीसाठी खालील बाबींचा वापर करावा style="display:block" data-ad-format="fluid" data-ad-layout-key="-gw-3+1f-3d+2z" data-ad-client="ca-pub-9904937471916771" data-ad-slot="9099651976"> १ ) पेरणीसाठी योग्य जमिनीची निवड करावी व पूर्वमशागत करून घ्यावी. २ ) वेळेवर पेरणी कराव

तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग

Image
तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग तुरी बद्दल  थोडक्यात                      शेतकरी बांधवांनो भारता मध्ये  तुरीची शेती करणार्‍या राज्यामध्ये अग्रगन्य राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. तूर हे राज्यातील सर्वात प्रमुख डाळवर्गीय पीक असून याची लागवड सर्व भागामद्धे खरीप हंगामात अंतरपिक म्हणून बाजरी, कापूस, ज्वारी तसेच सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबर केली जाते. तूर हेपिक डाळवर्गी असल्यामुळे यापिकाच्या मुळावरील असणार्‍या गाठीतील रायझोबियम या जिवाणूमुळे हवेतील नत्राचे फार मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होते. तसेच नत्रयूक्त रसायनिक खताची बचत देखील होते. तुरीच्या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागील कारणांमध्ये मर रोग व शेंगा पोखरणार्‍या आळीचा प्रादुर्भाव तसेच पिकाला फुले व शेंगा लागण्याच्या काळात पाण्याची कमतरता. यामुळे तुरीच्या उत्पन्नात फार मोठी घट होते. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणांची निवड तसेच कीड व रोगांबद्दल अपुरी माहिती या कारणांमुळे देखील उत्पन्नत घट होते. तूर लागवडी साठी जमीन            

कापसा वरील किड व रोग

Image
  कापूस लागवड | कापूस  लागवडीची योग्य वेळ |  कापसा वरील किड व रोग | कापसाचे खत नियोजन | कापूस लागवडीसाठी वानांची निवड | कापसाचे भरघोस उत्पादन                     🙏  शेतकरी बांधवांनो कापूस लगवडीपासूनच जर किड व रोगाचे योग्य नियोजन केले तर कापूस हे पीक नक्कीच आर्थिक फायदा करून देणारे पीक ठरू शकते. कापसाच्या कमी उत्पादना मागे बरीच कारने आहेत. त्यामध्ये किड व रोगामुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. कापसावर भारतामध्ये जवळपास १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यापैकी महाराष्ट्रात जवळपास २५ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. शेतकरी बांधवांनो कापसाच्या उत्पन्नात घट होण्यामागील आणखीन एक कारण म्हणजे कीड व रोगा बद्दल माहिती नसणे व कीटकनाशकांच्या जास्त तसेच काही वेळा चुकीच्या फवारण्या करणे. यामुळे उत्पन्नात घट होतेच परंतु खर्च देखील वाढतो. यासाठी पिकाच्या वाढीच्या टप्यानुसार तसेच रोग व किडींच्या प्रादुर्भावा नुसार वेळीच कीटकनाशकांची फवारणी तसेच इ. पद्धतींचा म्हणजे जैविक पद्धतीचा वापर करून वेळीच कीड व रोग व्यवस्थापन केल्यास नक्कीच आर्थिक फायदा होईल. कापूस ( पांढरे सोने ) कापूस ला

कांदा लागवड

Image
 कांदा लागवड सुधारित पद्धतीने कांदा लागवड, खरीप कांदा लागवड, रब्बी कांदा लागवड                       शेतकरी बांधवांनो कांदा लागवडी खालील क्षेत्राच्या बाबतीत भारत हा प्रथम क्रमांकावर आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारत हा कांदा उत्पादनात कमी असण्या मागच्या बर्‍याचश्या करणांमध्ये या पिकावर पडणार्‍या अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. रोपे लागवडीपासून ते कांदा साठवणुकीपर्यंत वेगवेगळ्या रोगांची झळ या पिकाला सहन करावी लागते. या अडचणींमुळे उत्पादनाचा दर्जा खलावतो परिनामी उत्पादन कमी मिळते. या पिकावरील कीड व रोगांचे अपुरे ज्ञान तसेच रोग नियंत्रणात आणण्यासाठी झालेला जास्तीचा खर्च यामुळे देखील कांदा शेती तोट्यात जाते. त्यामुळे कीड व रोगांची माहिती असणे आवश्यक असते. रोगाची लक्षणे दिसताच उपाययोजना करून रोग व कीड आर्थिक नुकसानी होण्या आधी आटोक्यात आणता येते. व उत्पन्नात वाढ होते.  कांदा लागवडीचे हंगाम                  कांदा लागवड ही साधारणतः खरीप हंगामामध्ये जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तसेच रांगडा ऑक्टोंबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि रब्बी डिसेंबर

बटाटे लागवड

Image
 बटाटे लागवड  बटाटे लागवड,  जमीन ,   बटाटे   बियाणे प्रक्रिया,  बटाटे  खते व्यवस्थापन,  बटाट्यावरील कीड व रोग  बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाट्यामध्ये जीवनसत्व ब आणि क भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे प्रथिने, चुना फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर होतांना दिसतो. बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तिवर्धक सुद्धा आहे. बटाटा हे  कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाला योग्य  तसेच नियोजित पद्धतीने लागवड केल्यास कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवून देणारे पीक ठरू शकते. बटाट्यापासून निरनिराळे खाद्य पदार्थ निर्मिती करता येत असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून सुशीक्षित  बेरोजगारांनी आपल्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोज गारीची समस्या दूर करता येऊ शकते.  जमीन मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत तसेच कसदार भुसभुशीत व उत्तम निचर्‍याची जमीन ही  बटाट्याचे उत्पन्न घेण्यासाठी तसेच लागवडीस योग्य असते, लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा